नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा
पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.
पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही!
आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा जळगांव | प्रतिनिधीपोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही!आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारापुणे | प्रतिनिधीअंगणवाडीतील बालके आणि गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आता प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. पोषण आहारात कोणत्याही प्रकारची गडबड, निष्काळजीपणा किंवा निकृष्ट दर्जाचा आहार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीतील पोषण आहारासंदर्भातील प्रकार समोर आल्यानंतर पुणे जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये उपलब्ध धान्य तसेच शिजवला जाणारा पोषण आहार तपासण्यात येणार आहे.आहाराची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अधिनस्त मुख्यसेविका आणि पर्यवेक्षिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तपासणीमध्ये पोषण आहार खराब किंवा अयोग्य दर्जाचा आढळल्यास तो संबंधित पुरवठादाराकडून तात्काळ बदलून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. तसेच पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.बालकांच्या पोषण आणि आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आदिती तटकरे यांनी दिल्याने अंगणवाडी प्रशासन आणि संबंधित पुरवठादारांमध्ये आता सतर्कता वाढली आहे. अंगणवाडीतील बालके आणि गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आता प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. पोषण आहारात कोणत्याही प्रकारची गडबड, निष्काळजीपणा किंवा निकृष्ट दर्जाचा आहार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीतील पोषण आहारासंदर्भातील प्रकार समोर आल्यानंतर पुणे जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये उपलब्ध धान्य तसेच शिजवला जाणारा पोषण आहार तपासण्यात येणार आहे. आहाराची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अधिनस्त मुख्यसेविका आणि पर्यवेक्षिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणीमध्ये पोषण आहार खराब किंवा अयोग्य दर्जाचा आढळल्यास तो संबंधित पुरवठादाराकडून तात्काळ बदलून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. तसेच पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बालकांच्या पोषण आणि आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आदिती तटकरे यांनी दिल्याने अंगणवाडी प्रशासन आणि संबंधित पुरवठादारांमध्ये आता सतर्कता वाढली आहे.
निबंध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल मालदाभाडी चे घवघवीत यश
जामनेर:- 25/08/2026अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य शाखा जामनेर च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, मालदाभाडी च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये पाचवी ते सातवी च्या पहिल्या गटात कु. मोहिनी जितेंद्र पाटील द्वितीय व याच गटात कु. नेहा दिलीप परखड हीने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच आठवी ते दहावीच्या गटात कु. पूर्वी संतोष नानोटे हीने द्वितीय क्रमांक मिळविला. या स्पर्धकांचा शाळेचे मुख्याध्यापक एस आर शिकोकार यांनी सत्कार केला. तसेच मार्गदर्शक विजय सैतवाल सर यांचे कौतुक केले. शाळेत शुद्धलेखन सराव व मुद्देसूद विषय मांडणीचे मार्गदर्शन मराठी विषय शिक्षक विजय सैतवाल सरांनी आम्हाला केले यामुळेच आम्ही यश संपादन करु शकलो असे स्पर्धकांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एस. पाटील यांनी केले तर आभार आर. एल. कोळी यांनी मानले. यशस्वी विद्यार्थ्यांचे ए. बी. पाटील, श्रीमती एस. एस. सोनवणे, श्रीमती के. आर. सुरवाडे, मनोज जैन यांसह पंचक्रोशीतील मान्यवर, गावकरी यांनी अभिनंदन केले आहे
नेरी येथे रस्ता रोको आंदोलन; दहा दिवसांत महामार्ग दुरुस्तीचे आश्वासन
जामनेर तालुका | नेरी :25/08/2026 जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गाची झालेली दुरवस्था आणि रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जामनेर तालुक्यातील नेरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनामुळे जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून येत्या दहा दिवसांत रस्त्यावरील दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतले. मात्र, दहा दिवसांच्या मुदतीत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या वतीने देण्यात आला आहे. महामार्गाची तातडीने दुरुस्ती करून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तीस वर्षांची निष्कलंक सेवा तरीही सक्तीच्या सेवानिवृत्तीचा बडगा: तरुण सुपुत्राने उठविला अन्यायाविरुद्ध आवाज
जामनेर: ३० वर्षांची निष्कलंक सेवा, तरीही सक्तीच्या सेवानिवृत्तीचा बडगा; तरुण सुपुत्र प्रारब्ध गोसावी यांचा वडिलांच्या न्यायासाठी लढा सुरू!जामनेर (विशेष प्रतिनिधी):सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) अंतर्गत ३० हून अधिक वर्षे अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्कलंक सेवा बजावणाऱ्या एका वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यावर ओढावलेल्या अन्यायाविरुद्ध त्यांच्या तरुण सुपुत्राने आता लढाऊ भूमिका घेतली आहे. जामनेर येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त कर्मचारी श्री. शिवचरण रामपुरी गोसावी यांना कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात घडलेल्या एका किरकोळ तांत्रिक बाबीमुळे थेट ‘सक्तीच्या सेवानिवृत्तीची’ कठोर शिक्षा सुनावण्यात आली असून, त्यांचे सुपुत्र प्रारब्ध गोसावी हे या अन्यायाविरुद्ध न्याय मिळवण्यासाठी धडपडत आहेत. सध्या या आदेशाविरुद्ध मुख्य अभियंता कार्यालय, नाशिक येथे अपील प्रलंबित आहे.प्राप्त माहितीनुसार, श्री. शिवचरण गोसावी यांनी आपल्या आयुष्याची तीन दशके शासकीय सेवेत समर्पित केली आहेत. परंतु, एका प्रकरणात त्यांना थेट सक्तीची सेवानिवृत्ती दिल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक व मानसिक संकट ओढावले आहे. वडिलांवरील या अन्यायाविरोधात त्यांचे सुपुत्र प्रारब्ध गोसावी यांनी स्वतः सर्व पाठपुरावा हाती घेतला असून, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, जळगाव यांनी दिनांक ०७/०८/२०२६ रोजीच्या पत्रान्वये (महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९७९ मधील नियम ५ नुसार) ‘किरकोळ शिक्षेचे’ पर्याय उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत एक अत्यंत सकारात्मक शिफारस मुख्य अभियंता, नाशिक यांच्याकडे पाठवली आहे.नाशिक कार्यालयाकडे अपील दाखलया शिफारसीनंतर, प्रारब्ध गोसावी यांनी स्वतः पाठपुरावा करून या प्रकरणाची कागदपत्रे व अपील दिनांक १३/०८/२०२६ रोजी मुख्य अभियंता कार्यालयात अधिकृतपणे दाखल केले असून (आवक क्र. ७४९५), त्यावर सध्या प्रशासकीय स्तरावर अभ्यास सुरू आहे. परंतु, दिवस लोटूनही अद्याप अंतिम निर्णय न झाल्यामुळे प्रारब्ध गोसावी यांनी प्रशासनाच्या भूमिकेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.वडिलांच्या ३० वर्षांच्या प्रामाणिक सेवेचा व वृद्धपळाचा विचार करून या अन्यायकारक आदेशाचे तात्काळ पुनरावलोकन करावे आणि नियमानुसार किरकोळ शिक्षा देऊन न्याय द्यावा, अशी आर्त हाक सुपुत्र प्रारब्ध गोसावी व त्यांच्या कुटुंबीयांतर्फे दिली जात आहे. जर यावर लवकरात लवकर योग्य निर्णय झाला नाही, तर हा लढा आणखी तीव्र केला जाईल, असा इशारा प्रारब्ध गोसावी यांनी दिला आहे.
CJP 5 सप्टेंबरला पुन्हा दिल्लीत धडकणार; इंडिया गेट ते दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत मोर्चाची घोषणा
नवी दिल्ली | 25 ऑगस्ट 2026 केंद्र सरकारने 25 जुलै रोजी दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप करत *कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने पुन्हा दिल्लीमध्ये आंदोलनाची घोषणा केली आहे. CJP कडून **5 सप्टेंबर 2026 रोजी शांततापूर्ण मोर्चा** काढण्यात येणार असून, हा मोर्चा **इंडिया गेटपासून सुरू होऊन नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत** जाणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व **NEET प्रकरणातील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसह कथित पोलिस अत्याचाराच्या पीडितांकडून** करण्यात येणार असल्याचे CJP ने म्हटले आहे. देशभरातील विद्यार्थी आणि तरुणांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. 25 जुलैच्या आंदोलनानंतर सरकारने काही आश्वासने दिली होती; मात्र ती पूर्ण झाली नसल्याचा दावा CJP करत आहे. त्यामुळे सरकारला दिलेली आश्वासने पूर्णकरण्याची मागणी करत 5 सप्टेंबरचा मोर्चा काढण्यात येणार आहे. **दरम्यान, 5 सप्टेंबरच्या आंदोलनामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.**
उद्या बँकेत जाणार असाल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद; जाणून घ्या कारण
जळगाव | 25 ऑगस्ट 2026 :बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम उद्या करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बुधवार, 26 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत. ईद-ए-मिलाद/मिलाद-उन-नबी निमित्त विविध राज्यांमध्ये बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातही बँका बंद महाराष्ट्राच्या 2026 सार्वजनिक सुट्टीच्या अधिकृत यादीत 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बँकांच्या शाखांमध्ये प्रत्यक्ष ग्राहक सेवा उपलब्ध राहणार नाही. मुंबई, नागपूर आणि बेलापूरसह महाराष्ट्रातील संबंधित बँक शाखांवर या सुट्टीचा परिणाम होणार आहे. देशातील अनेक शहरांमध्येही सुट्टी 26 ऑगस्ट रोजी बँक सुट्टी असलेल्या ठिकाणांमध्ये मुंबई, नागपूर, बेलापूर, नवी दिल्ली, लखनऊ, कानपूर, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, भोपाळ, जयपूर, जम्मू, श्रीनगर, कोची, तिरुवनंतपुरम, पटना, रायपूर, रांची आणि इम्फाळ यांसह अनेक शहरांचा समावेश आहे. मात्र बँक सुट्ट्या राज्य आणि शहरानुसार बदलत असल्याने आपल्या शाखेची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे. ऑनलाइन बँकिंग मात्र सुरू राहणार बँकेच्या शाखा बंद असल्या तरी UPI, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि ATM यांसारख्या डिजिटल सेवा सामान्यतः सुरू राहतील. मात्र चेक क्लिअरन्स, कागदपत्र पडताळणी, खाते उघडणे किंवा शाखेत प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असलेली कामे पुढे ढकलावी लागू शकतात. ग्राहकांनी काय करावे? बँकेत प्रत्यक्ष जाऊन करावयाचे काम असल्यास ते आजच पूर्ण करून घ्यावे किंवा पुढील कार्यदिवसासाठी नियोजन करावे. विशेषतः रोख रक्कम जमा करणे, चेकशी संबंधित काम, कागदपत्रे जमा करणे आणि शाखेत करावयाच्या इतर कामांसाठी ग्राहकांनी वेळेपूर्वी नियोजन करणे आवश्यक आहे. JBN News आवाहन:बँकेची शाखा बंद असली तरी डिजिटल व्यवहार उपलब्ध असू शकतात. मात्र महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांपूर्वी आपल्या संबंधित बँकेकडून किंवा शाखेकडून सुट्टीची खात्री करून घ्या.— JBN News
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी मोठी खुशखबर; कोणत्याही क्षणी खात्यात जमा होणार हप्ता
मुंबई, दि. २५ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात योजनेचा पुढील हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतल्याचे वृत्त असून, सुमारे १.५० कोटी पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट DBT (Direct Benefit Transfer) द्वारे रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती आहे. रक्षाबंधनाआधी मिळणार हप्ता? ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹१,५०० आर्थिक मदत दिली जाते. रक्षाबंधनाच्या आधीच पुढील हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ₹१,५०० जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हप्ता जमा झाल्यानंतर लाभार्थी महिलांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बँकेकडून SMS मिळू शकतो.
सणासुदीच्या ऐनवेळी गृहिणींचं बजेट कोलमडलं!
साखरेच्या दरात मोठी वाढ; डाळी-कांद्यासह किराणा बाजारावर महागाईचा दबाव जळगाव | २५ ऑगस्ट २०२६ सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर महागाईचा दबाव वाढताना दिसत आहे. विशेषतः साखरेच्या दरात गेल्या काही आठवड्यांत मोठी वाढ झाल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. काही ठिकाणी साखरेचा किरकोळ दर ६० ते ७० रुपयांच्या आसपास पोहोचल्याचे वृत्त आहे. गणपती आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर गोड पदार्थांची मागणी वाढत असतानाच साखरेच्या उपलब्धतेवरही दबाव निर्माण झाला आहे. उत्पादनातील घट, वाढती मागणी आणि बाजारातील परिस्थिती यामुळे साखरेचे दर वाढल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, डाळी आणि कांद्याच्या दरांमध्येही चढ-उतार सुरू असल्याने गृहिणींच्या महिन्याच्या बजेटचे गणित बिघडत आहे. पुरणपोळी, श्रीखंड, लाडू यांसारख्या सणासुदीच्या पदार्थांसाठी लागणाऱ्या साहित्याच्या वाढत्या खर्चामुळे यंदाचा सण सामान्य कुटुंबांसाठी महागडा ठरण्याची शक्यता आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने साखरेच्या साठ्यावर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला असून, १ सप्टेंबरपासून काही व्यापाऱ्यांसाठी १५ दिवसांच्या साठ्याची मर्यादा लागू होणार आहे. सण जवळ येत असताना किराणा बाजारातील दर आणखी वाढणार का? याकडे आता सर्वसामान्य ग्राहकांचे लक्ष लागले आहे. JBN महाराष्ट्र NEWS — तुमच्या गावापासून महाराष्ट्रपर्यंत…
नादुरुस्त बायपासने घेतला आणखी एक बळी!
टँकरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी, परिसरात संताप जळगाव : तरसोद ते पाळधी बायपास मार्गाची नादुरुस्ती आणि त्यावरून वाहतूक वळवल्यामुळे जळगाव शहरातील रस्त्यांवर अपघातांचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर टँकरच्या धडकेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.बायपास मार्गाची अवस्था खराब झाल्याने अवजड वाहनांची वाहतूक जळगाव शहरातून वळविण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांची संख्या वाढली असून, अपघातांचा धोका वाढल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.या अपघातानंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नादुरुस्त बायपासची तातडीने दुरुस्ती करून अवजड वाहतूक पुन्हा बायपास मार्गावरून सुरू करावी, तसेच शहरातील वाहतुकीसाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान, या दुर्घटनेतील जखमींवर उपचार सुरू असून अपघाताबाबत अधिकृत तपशील आणि पोलिसांचा पुढील तपास अपेक्षित आहे.नागरिकांचा सवाल : आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?
शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू
शिरसोली : शिरसोली येथून बेपत्ता झालेल्या एका तरुणाचा मृतदेह नेव्हरे धरणाच्या पाण्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणाचा मृत्यू नेमका आत्महत्येमुळे झाला की यामागे घातपात आहे, याबाबत सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण काही काळापासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू असताना नेव्हरे धरण परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात असून हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपात, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणात पोलिस तपासातून पुढे काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


